जातीय जनगणनेमुळे समाजात फूट पडणार नाही : मकवाना   

नवी दिल्ली : जातीय जनगणनेमुळे समाजात फूट पडणार नाही. उलट जनगणनेद्वारे गोळा केलेला डेटा धोरणात्मक निर्णयांसाठी आधार म्हणून काम करेल आणि सामाजिक न्याय मजबूत करेल, असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत बोलताना मकवाना म्हणाले, तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना केली होती. 
 
१९३१ नंतर देशभरातील जातींचा डेटा गोळा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. तथापि, एसईसीसी-२०११ मधील जातीचा डेटा कधीही पूर्णपणे प्रसिद्ध झाला नाही किंवा वापरला गेला नाही. जातीय जनगणनेमुळे सामाजिक न्याय मजबूत होईल.मागासलेल्या जातींचे उत्थान होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसूचित जाती समुदायाच्या स्वप्नातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानता या तिन्ही पैलूंना बळकटी मिळेल. 

Related Articles